Wednesday, August 31, 2011
लुगडय़ाने केली सुटका
छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशहाच्या व औरंगजेबाच्या मोठय़ा फौजांशी लढताना गनिमी काव्याचा अवलंब केला. मोठय़ा शत्रूशी लढत द्यायची तर ती गनिमी पद्धतीनेच द्यावीही लागते. या लढतींनी महाराजांचे राज्य आणि मोठेपण या दोहोतही भर घातली. कोणत्याही लढतीत स्वतर्ला कमीपणा येईल असे वर्तन राजांनी कधी केले नाही. आग्र्याच्या तुरूंगातून सुटका करून घेतानाही त्यांनी आपले क्षात्रतेज कायम राखले. आपल्यासोबत आलेल्या सहकार्यांना सोबत घेऊनच ते तुरूंगाबाहेर पडले. ज्यांना मागे रहावे लागले त्यांनाही पुढच्या काळात त्यांनी सन्मानाने स्वराज्यात आणले. त्यांच्या थोरवीचे गमकही ऐन अडचणीत असताना त्यांनी राखलेले त्यांचे मर्दानी मोठेपण हेच होते.. या पाश्र्वभूमीवर रामलीला मैदानावरील पोलिस कारवाईपासून स्वतर्ची सुटका करून घेण्यासाठी ीवेष परिधान करून पळ काढणार्या रामदेवबाबाने आपल्या तशा पळपुटेपणाची तुलना महाराजांच्या गनिमी काव्याशी करावी याएवढा हास्यास्पद व मूर्ख प्रकार दुसरा नाही. छत्रपतींचा याहून मोठा अपमानही याआधी असा कोणी केला नसेल. ज्याने योग शिकवायचा त्याने योगच शिकवावा. योग शिकायला आलेली माणसे सारे काही मुकाटय़ाने करतात. बसा म्हटले की बसतात, उठा म्हटले की उठतात आणि हातपाय हलवायला सांगितले की तेही हलवतात. युद्धात आणि गनिमी लढतीत असे होत नाही. हां, गनिमी लढतीचे एक तंत्र हे की त्यात स्वतर्च्या बचावाची तयारी आरंभापासूनच करून ठेवावी लागते. शत्रू हावी होऊ लागला की त्या मार्गाने सुरक्षित जागी पोहचायचे असते. रामदेवबाबाने गनिमी लढय़ातल्या एवढय़ाच एका तंत्राचा अवलंब केलेला परवा दिसला. त्यासाठी ीवेषापासूनची सारी तयारी त्याने अगोदरच करून ठेवली. आपल्यासोबत असलेल्या ी-पुरुषांना पोलिसांच्या ताब्यात तसेच सोडून देऊन त्यांनी स्वतर्चाच तेवढा बचाव केला. यात सहकार्यांच्या सुरक्षेविषयीची आस्था नव्हती आणि त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे राहण्याची तयारीही नव्हती. वर ीवेष धारण करून पळण्यात मर्दानी बाणा सोडा पण योगाने दिलेले आत्मबळही नव्हते. -ीवेष धारण करण्यात कमीपणा कसला, िया याच आपल्या माता आहेत- हे मागाहून सुचलेले जे शहाणपण रामदेवबाबा आता लोकांना सांगत आहेत ते आणखीच दयनीय व सगळ्य़ा योगाचाराने आणलेल्या आत्मसामथ्र्याचा पराभव उघड करणारे आहे. या आधीही देशात आंदोलने झाली. त्यात गोळीबार झाले, लाठीमार झाला, माणसे तुरूंगातही डांबली गेली. गेल्या शंभर वर्षाचा स्वातंर्त् य लढय़ापासूनचा देशाचा इतिहास जनतेच्या अशा पराक्रमांनीच भरला आहे. मात्र पोलिसांच्या तावडीतून सुटका करून घेण्यासाठी कोणा स्वातंर्त् य वीराने वा सामाजिक कार्यकत्र्याने लुगडय़ाचा पदर डोक्यावर घेतल्याचे उदाहरण त्यात नाही. रामदेवबाबाने ते गालबोट या इतिहासाला लावून आजवरची समाजाची शौर्यकथा सगळ्य़ा दुषित नजरांपासून सुरक्षित केली एवढेच यातले त्यांचे मोठेपण.. जाता जाता या बाबांनी अण्णा हजारे यांच्या लोकपाल विधेयकाचाही फज्जा उडविला. या बाबाची सरकारने उचलबांगडी केली म्हणून अण्णांनी त्या विधेयकाच्या मसुदा समितीवर आपला बहिष्कार जाहीर केला. त्यावर -याल तर तुमच्यासोबत, न याल तर तुमच्याशिवाय- असे तात्काळ जाहीर करून सरकारने ते विधेयक स्वतर्च पूर्ण करण्याची तयारी आता केली आहे. तात्पर्य, रामदेवबाबाने आपले आंदोलन बुडविले आणि अण्णांच्या आंदोलनाचेही मातेरे केले.. भ्रष्टाचाराचे आरोपी तसेही तुरूंगात जात आहेत आणि लोकपाल विधेयकही आता तयार होत आहे. मग अण्णांचे उपोषण, रामदेवाचा प्राणायाम, रामलीला मैदानावरच्या कसरती आणि अखेर त्या बाबाची लुगडय़ातून झालेली सुटका हे सारे घडले ते कशासाठी?
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment